एक दिवस कृष्णदेव राय राजाने तेनालीरामला विचारले ‘तेनालीराम तू सांगू शकतो का? आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते?’
‘हो, मी सांगू शकतो, महाराज.’ तेनालीराम तात्काळ बोलला.
‘पण मला अचूक नंबर पाहिजे.’ राजा बोलला.
‘हो महाराज, मी अचूक नंबरच सांगेन’ तेनालीराम ने उत्तर दिले.
‘जर तू मला अचूक नंबर सागण्यास नापास झाला, तर तुला फाशीची शिक्षा दिली जाईल.’ राजा हसत बोलला.
‘मी तुमचे आव्हान स्वीकारतो, महाराज.’ तेनालीराम निर्भयपणे बोलला.
दरबारी कल्पना करत होते की तेनालीराम आता मोठया संकटात सापडणार आहे, त्यांना खात्री होती की पक्षी मोजणे हि अशक्य गोष्ट आहे.
‘ठिक आहे! मी तुला दोन दिवसांचा वेळ देत आहे. तिसऱ्या दिवशी तुला सांगावे लागेल कि आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत?’ राजा बोलला.
तिसऱ्या दिवशी तेनालीराम दरबारात आला. राजाने त्याच्याकडे बघितले आणि विचारले, ‘आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते तू मोजले का?’
तेनालीराम आपल्या जागेवरून उठला आणि बोलला, ‘महाराज! आपल्या राज्यात एकूण एक लाख पन्नास हजार नऊशे नव्यान्नव कावळे आहेत.’
‘हे खरे आहे का?’ राजाने विचारले.
‘महाराज शंका असल्यास मोजून घ्या.’ तेनालीराम बोलला.
‘पुर्नमोजणी केल्यानंतर संख्या कमी – जास्त असली तर’? राजा बोलला.
‘महाराज! मी सांगितलेल्या संख्येमध्ये फरक आढळल्यास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल.’ तेनालीराम बोलला.
राजाने विचारले, ‘काय कारण असू शकते?’
तेनालीरामने उत्तर दिले, ‘जर राज्यातील कावळयांची संख्या वाढली तर त्यामागील कारण आहे की कावळयांचे काही नातेवाईक व मित्रमंडळी त्यांना भेटायला आले आहेत. पण जर राज्यातील कावळयांची संख्या कमी झाली तर आपल्या राज्यातील काही कावळे हे त्यांच्या नातेवाईकांकडे व मित्रांना भेटायला गेले आहेत. अन्यथा मी सांगितलेली कावळयांची संख्या पूर्णपणे बरोबर आहे.’
राजाकडे काही उत्तर नव्हते.
तेनालीरामवर जळणारे बाकीचे दरबारी मनातल्या मनात विचार करत होते की नेहमीप्रमाणे तेनालीराम हा आपल्या चातुर्याने अवघड परिस्थितीतून बाहेर निघाला.
राजाने तेनालीरामला त्याच्या व्यवहार चातुर्याबद्दल बक्षिस दिले. “
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply