त्या दोघांच बिनसलचं होतं गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची.. तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण. ते भांडण मिटवायचं म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला. पण ती गप्पच होती, शांत होती, काहीचं बोलायला तयार नव्हती. तिचा चेहराचं सांगत होता की, तिचा निर्णय झालेला होता.. ते घरी परत जात होते. तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहुन ती त्याला म्हणाली “मला वाटतं.., हे असं रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही.. मला वाटतं आपण आपापल्या वेगळ्या वाटांनी जावं.. मी तसा निर्णय घेतलाय.. यापुढे आपण न भेटनचं योग्य. ते ऐकून त्याला धक्काच बसला.. त्याने गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले, त्याने खिशात चाचपून पाहिलं. एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली.. थेट यांच्या गाडीवरच येऊन आढळली..
त्या अपघातात ‘तो’ जागीच ठार झाला आणि तिला मात्र कीरकोळ जखम झाली. हातात ते चीटोर तसंच होतं ते एकदम उघडून तीन पाहिलं तर त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होत ‘तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन…!’ तो खरंच त्याक्षणी मेला होता.. प्रेम असं ही असतं जे मागू ते देऊन मोकळ होतं. मागायचं काय, मरणं की जगणं… हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं लागतं.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply